निवासी संपादकअभावी कोल्हापूर मटा मठ्ठच...

कोल्हापूर - महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय चोरमारे यांची मुंबईला बदली होवून चार महिने झाले तरी कोल्हापुरात निवासी संपादकाची जागा अजून भरलीच गेली नाही.त्यामुळं कोल्हापूर मटा मठ्ठच झाला आहे.
अंकात दररोज कोणत्या ना कोणत्या चुका होणे,महत्वाच्या बातम्या सुटणे,एकच बातम्या दोन पेजवर प्रकाशित होणे,बातम्यांत शुद्धलेखनाचाच्या अक्षम्य चुका होणे ही नित्याची बाब झाली आहे.त्यात ऑफीसमध्ये होणा-या किरीकिरीमुळे विजय पाटील यांनी मटा सोडून पुन्हा पुढारीचा रस्ता धरला.
जेव्हा चोरमारे मुंबईत स्थायिक झाले तेव्हा पुण्याचे कार्यकारी संपादक पराग करंदीकर यांनी कोल्हापूरसाठी दोघांच्या मुलाखती घेतल्या होत्या.मुलाखती देणा-यामध्ये पुढारीचे सहाय्यक कार्यकारी संपादक मुुकुंद फडके आणि पुण्यनगरीचे विजय जाधव यांचा समावेश होता.परंतु नंतर काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मटाची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.त्यामुळे पराग करंदीकर येत्या आठवड्यात कोल्हापुरात येणार असल्याची चर्चा आहे.या भेटीत ते आता सकाळचे सहयोगी संपादक चंद्रशेखर माताडे,पुढारीचे फडके किंवा पुण्यनगरीचे जाधव यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करतील,अशी चर्चा आहे.
कोल्हापुरातून जी दैनिके निघतात,त्यात सांगली,सातारा आणि कोल्हापुरात पुढारी नंबर एकवर आहे.मात्र बेळगावासह कोकणात पुढारी चांगलाच मागे गेला आहे.त्याखालोखाल लोकमत,सकाळ,बेळगाव तरूण भारत आणि पुण्यनगरी असा क्रम आहे.मटा सर्वात शेवटी आहे.कोल्हापूर मटाने पुन्हा एकदा वाचक स्कीम राबवली आहे.वार्षिक ९९ रूपये भरा आणि महिन्याला ५० रूपये द्या,शिवाय एक गिप्ट मिळवा,यामुळं मटाचा जेमतेम खप झाला आहे.जाहिरात बिझनेसमध्ये मटा सर्वात शेवटी आहे.
त्यासाठी मटाला हवा आहे,दमदार निवासी संपादक...आपणाकडे ही पॉवर असेल तर पराग करंदीकर यांच्याशी संपर्क करा.त्यांना बेरक्याच्या शुभेच्छा...