जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत आता राजेश क्षीरसागर यांचा दरारा....

मराठी वृत्त वाहिन्या आता हळू हळू मराठी सिनेमांप्रमाणे कात टाकू लागल्या आहेत.झी 24 तास ने ज्या प्रमाणे उच्च विद्या विभूषित डॉ उदय निर्गुड़कर याना आणून एक नविन पायंडा पाडला त्या प्रमाणे आता 'थेट -अचूक -बिनधास्त' वाल्या 'जय महाराष्ट्र' वाहिनीनेही उच्च विद्याविभूषित सीईओ आणून कात टाकण्याचा प्रयत्न केलाय.
जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत सीईओ म्हणून रुजू झालेत राजेश क्षीरसागर हे उच्च विद्याविभूषित असून मेक्यानिकल इंजिनीअरिंग करून त्यानी बिज़नेस मैनेजमेंट केले.  त्यानंतर बरीच वर्ष विविध मोठ्या कंपन्यांमधे महत्वाच्या जबाबदारी पार पाडल्यावर त्यानी सहारा वाहिनी मध्ये उपाध्यक्षपदी आपली सेवा दिली.
सहारा वृत्त वहिनीला स्वतःची वेगळी ओळख (एकाच व्यक्तिच्या टॉक शो च्या जोखडातून मुक्त करुन) देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सहारातुन बाहेर पडल्यावर त्यानी स्वतः ची सल्लागार संस्था सुरु केली आणि अनेक वाहिन्याना आकार देण्याच् काम केले
जय महाराष्ट्र वृत्त वाहिनित त्यांच्या येण्यामुळे एका नविन पर्वाला सुरुवात झाली आहे. नवनवीन कल्पनांना मोकळे आकाश मिळाले आहे
सर्व राजकीय पक्षात व्यक्तिगत संबंध् असलेले राजेश सर्वानाच् आपले वाटत आहेत. व्यवसाय वृद्धी हे धेय समोर ठेऊन सहारात काम केल्यामुळे पूर्वी नरेंद्र मोदी पासून उद्धव ठाकरेंन पर्यन्त सर्वानीच त्याना वेळोवेळी भेटीच्या वेळा देऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली आहे
नविन कल्पनांचे भंडार असलेले राजेश जय महाराष्ट्र मधे अनेक बदल करत आहेत.
प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला माणूस ही त्यांची कार्यपद्धती असल्यामुळे कर्मचार्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे
स्वतः बद्दल अतिशय कमी बोलणारी मात्र कामाने उत्तुंग शिखर निर्माण करणारी माणसे प्रसार माध्यमात अभावानेच सापड़तात राजेश क्षीरसागर हे त्यातलेच एक नावआता ते जय महाराष्ट्र वाहिनीला कसे उच्च शिखरावर नेतात त्याची प्रतीक्षा आहे.