बेरक्या इम्पॅक्ट

औरंगाबाद दैनिक भास्करच्या रिपोर्टर उज्वला साळुंके संदर्भात बेरक्यावर वृत प्रसिद्ध होताच त्यांचा दीड महिन्याचा पगार तब्बल दोन महिन्यानंतर देण्यात आला आहे.
उज्वला साळुंके यांना कसलीही नोटीस न देता कामावरुन काढण्यात आले होते व त्यांनी पगाराची मागणी केली असता राजीनामा दिल्यानंतरच पगार दिला जाईल असे सांगत दोन महिने झाले तरी पगार दिला नव्हता.
यासंदर्भात बेरक्यावर वृत्त प्रसिद्ध होताच सोमवारी उज्वला साळुंकेचा राजीनामा न घेता पगार देण्यात आला. त्यांना परत कामावर घेऊन भास्कर व्यवस्थापन न्याय देते की नाही हे महत्त्वाचे आहे.