औरंगाबाद - लोकमतचे उपसंपादक सतिश सुदामे घराच्या गच्चीवरून पडून गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक >> औरंगाबाद - दिव्य मराठीचे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांच्या बदलीला अधिकृत दुजोरा...खांडेकर लवकरच महाराष्ट्र सोडणार...प्रशांत दीक्षित यांच्याकडे दिव्य मराठीची सुत्रे येणार... >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा : berkya2011@gmail.com

शनिवार २५ मे २०१३

नाशिक गावकरीची अवस्था बिकट

नाशिक- वृत्तपत्र म्हणजे गावकरी अशी ख्याती असलेल्या नाशिक गावकरीची अवस्था बिकट झाली आहे. डीएम आणि मटासारखे मोठे पेपर सुरु झाल्यानंतरही संपादक मालक  वंदन पोतनीस यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी कुठलीच हालचाल न केल्यामुळे कित्येक पत्रकार घडविणारा हा पेपर सगळ्यात मागे पडला आहे.
 दीड वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे पगार अनियमित आहेत. अनेक ज्येष्ठ कर्मचारी यामुळे सोडून गेले आहेत. ज्यांना काहीच पर्याय नाही असे उपसंपादक आणि ऑपरेटरच आता  शिल्लक आहेत. ले-आऊट सुधारूनही प्रिंटींग आणि कागद खराब असल्यामुळे वाचकांना आकर्षित करण्यात गावकरी मागे पडत आहे. संपादकीय विभागात पीटीआय आणि पहिल्या पानांची जबाबदारी सांभाळणारे अनिल दीक्षित, दीपक रत्नाकर पुण्य नगरीला जॉईन झाले आहेत. महापालिकेत सर्वात वजनदार वार्ताहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळशीदास बैरागीवर पुण्य नगरीमध्ये परिसर वार्ताहर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. क्राइम बीट पाहणारे संतोष लोळगे यांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. जवळपास साठ टक्के कर्मचारी सोडून गेले तरी एकालाही वंदनरावांनी थांबविले  नाही. सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस, ग्रेचुईटी देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. गावकरीच्या इमारतीत असलेल्या आणि गावकरीचे बहुतांश व्यवहार असलेल्या रुपी बँकेवर निर्बंध आल्यामुळेही मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरेंनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 'खास' मित्रांसमवेत परदेश दौरा केला आहे.

शुक्रवार २४ मे २०१३

अकोला न्यूज एक्स्प्रेस ...

अकोला - देशोन्नतीचे कार्यकारी संपादक रवी टाले यांचा राजीनामा...टाले हे पोहरेंचे फॅमिली मेंबर....राजीनामा परत घेणार की अन्य पेपरला जाणार,याबाबत उलट - सुलट चर्चा...

अकोला - सकाळचे संपादकीय प्रमुख म्हणून सचिन काटे अकोल्यात...सकाळमधील पडझड रोखण्यासाठी काटेंवर जबाबदारी...

अकोला - डी.एम.च्या पार्श्वभूमीवर लोकमतचे संपादकीय प्रमुख प्रेमदास राठोड यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.राठोड एक दिवस मुंबईत राहिले आणि रजा टाकून पुन्हा अकोल्यात आले आहेत.राठोडबाबत बाबूजी काय निर्णय घेतात याकडे लक्ष...
- लोकमतचे नवे संपादकीय प्रमुख गजानन जानभोर सोमवार दि.27 मे रोजी अकोल्याचा पदभार स्वीकारणार आहेत.
 


 ..........................................................................................

मीडियातील प्रत्येक बातमीवर बेरक्याची नजर आहे...कोणतीही बातमी दबणार नाही किंवा दबली जाणार नाही...त्यासाठी बेरक्या कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे...
त्यासाठी वाचत रहा - पत्रकारांचा पाठीराखा : बेरक्या उर्फ नारद 

पांडेला लागले मानबिंदूचे वेध


मी मराठी : भिक नको पण कुत्रा आवर

मुंबई - राज्यातील मी मराठीच्या स्ट्रिंजर रिपोर्टरचे गेल्या दीड वर्षापासून मानधन आणि बिले थकली असून, मानधन मागितले असता,काम करू वाटले करा अन्यथा साडून द्या, अशी धमकी मँनेजमेंटकडून दिली जात आहे.त्यामुळे या स्ट्रिंजर रिपोर्टरना  भिक नको पण कुत्रा आवर म्हणण्याची पाळी आहे.
राज्यात मी मराठीचे राज्यात जवळपास 40 स्ट्रिंजर रिपोर्टर आहे.त्यांचे दोन वर्षापासून मानधन आणि बिले थकली होती.बेरक्याने मध्यंतरी वृत्त दिल्यानंतर त्यांना सहा महिन्याचे मानधन मिळाले.आता उर्वरित दीड वर्षाचे मानधन मागितले असता,काम करू वाटले तर करा अन्यथा सोडून द्या म्हणून सांगितले जात आहे.
मी मराठीची मालकी पुर्वी कांचन अधिकारी यांच्याकडे होती.गेल्या वर्षभरापासून महेश मोतेवार यांच्याकडे आहे.मोतेवारचे अनेक उद्योगधंदे आहेत.मी मराठी केवळ एक दबाबतंत्र आहे.मोतेवार यांना स्ट्रिंजर रिपोर्टरच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.काही दिवसांपुर्वी पाच स्ट्रिंजर रिपोर्टरना कामावरून काढून टाकण्यात आले.आता अनेकांवर टांगती तलवार ठेवण्यात आली आहे.
मी मराठी 24 तास बातम्या सुरू करणार, ही केवळ अफवा आहे.त्यात कसलाही दम नाही.

गुरुवार २३ मे २०१३

पत्रकारांना पालिका रुग्णालयात मोफत उपचार देण्याची मागणी

मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिका रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळावेत अशी मागणी जर्नलिस्ट युनिअन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मुंबईचे महापौर सुनील प्रभू व पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाकडे अधिस्वीकृत पत्रकार म्हणून नोंद असलेल्या पत्रकारांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार घेण्याची सोय आहे. अशी सोय मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना पालिकेकडून दिली जात नाही. महापौर सुनील प्रभू व आयुक्त सीताराम कुंटे यांनी लवकरात लवकर निर्णय घेवून शासनाप्रमाणे पालिकेमधील पत्रकारांना  रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत अशी मागणी जर्नलिस्ट युनिअन ऑफ महाराष्ट्रचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम, भाजपा गटनेते दिलीप पटेल, मनसेचे गटनेते दिलीप लांडे, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यानाही देण्यात आले आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook