नाशिक- वृत्तपत्र म्हणजे गावकरी अशी ख्याती
असलेल्या नाशिक गावकरीची अवस्था बिकट झाली आहे. डीएम आणि मटासारखे मोठे
पेपर सुरु झाल्यानंतरही संपादक मालक वंदन पोतनीस यांनी स्पर्धेत
टिकण्यासाठी कुठलीच हालचाल न केल्यामुळे कित्येक पत्रकार घडविणारा हा पेपर
सगळ्यात मागे पडला आहे.
दीड वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे पगार अनियमित आहेत. अनेक ज्येष्ठ कर्मचारी यामुळे सोडून गेले आहेत. ज्यांना काहीच पर्याय नाही असे उपसंपादक आणि ऑपरेटरच आता शिल्लक आहेत. ले-आऊट सुधारूनही प्रिंटींग आणि कागद खराब असल्यामुळे वाचकांना आकर्षित करण्यात गावकरी मागे पडत आहे. संपादकीय विभागात पीटीआय आणि पहिल्या पानांची जबाबदारी सांभाळणारे अनिल दीक्षित, दीपक रत्नाकर पुण्य नगरीला जॉईन झाले आहेत. महापालिकेत सर्वात वजनदार वार्ताहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळशीदास बैरागीवर पुण्य नगरीमध्ये परिसर वार्ताहर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. क्राइम बीट पाहणारे संतोष लोळगे यांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. जवळपास साठ टक्के कर्मचारी सोडून गेले तरी एकालाही वंदनरावांनी थांबविले नाही. सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस, ग्रेचुईटी देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. गावकरीच्या इमारतीत असलेल्या आणि गावकरीचे बहुतांश व्यवहार असलेल्या रुपी बँकेवर निर्बंध आल्यामुळेही मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरेंनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 'खास' मित्रांसमवेत परदेश दौरा केला आहे.
दीड वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे पगार अनियमित आहेत. अनेक ज्येष्ठ कर्मचारी यामुळे सोडून गेले आहेत. ज्यांना काहीच पर्याय नाही असे उपसंपादक आणि ऑपरेटरच आता शिल्लक आहेत. ले-आऊट सुधारूनही प्रिंटींग आणि कागद खराब असल्यामुळे वाचकांना आकर्षित करण्यात गावकरी मागे पडत आहे. संपादकीय विभागात पीटीआय आणि पहिल्या पानांची जबाबदारी सांभाळणारे अनिल दीक्षित, दीपक रत्नाकर पुण्य नगरीला जॉईन झाले आहेत. महापालिकेत सर्वात वजनदार वार्ताहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळशीदास बैरागीवर पुण्य नगरीमध्ये परिसर वार्ताहर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. क्राइम बीट पाहणारे संतोष लोळगे यांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. जवळपास साठ टक्के कर्मचारी सोडून गेले तरी एकालाही वंदनरावांनी थांबविले नाही. सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस, ग्रेचुईटी देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. गावकरीच्या इमारतीत असलेल्या आणि गावकरीचे बहुतांश व्यवहार असलेल्या रुपी बँकेवर निर्बंध आल्यामुळेही मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरेंनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 'खास' मित्रांसमवेत परदेश दौरा केला आहे.
